ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने पाहुणेवाडी येथे ‘एआय आधारित ऊस शेती आणि संतुलित खत व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय बारामती संलग्न महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सहाय्यक कृषी अधिकारी देविदास लोणकर व धीरज शिंदे यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे विषय विशेषज्ञ विस्तार संतोष गोडसे यांनी ‘संतुलित खत नियोजन’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विषय विशेषज्ञ तुषार जाधव यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ऊस शेती तंत्रज्ञान’ याबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, प्राचार्य प्रा. जया तिवारी, डीआय नॉमिनी डॉ. ताई देवकाते, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलकंठ जंजिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, डॉ. पल्लवी देवकाते व प्रा. शिवानी कोकरे देसाई यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पाहुणेवाडीच्या ग्रामसेवक सुजाता आगवणे, प्रशासक भगवानराव तावरे, प्रशासक समिती सदस्य राधिका भंडलकर, सहाय्यक राकेश गोळे यांच्यासह शेतकरी महेश कोडे, अभिषेक तावरे, अजित तावरे, विराज तावरे, अभिजीत तावरे, कैलास तावरे, नामदेव दावले व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
कृषीदूत पार्थ सरडे, रोशन शिंदे, संकेत बस्ते, चैतन्य बोडके, दादासाहेब सावंत, कुणाल पडोळ व कुमार पडोळ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले.
पाहुणेवाडी ग्रामपंचायतीच्या शेजारी आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींची माहिती मिळाली. उपस्थित शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
©2026. All Rights Reserved.